Friday, December 2, 2011

देवयानी (34)

सरतेशेवटी ...

माझ्या मनातली जी सल होती, बोच होती, ती मी इथे उतरवण्याचा प्रयत्न केला. वाचताना कदाचित माझी दयाही आली असेल काही जणांना. पण हा एक आयुष्याचा दुखरा कोपरा आहे. सगळं आयुष्यच दुःखी आहे असं नव्हे. विशेषतः माझ्या कामाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत मी अतिशय समाधानी आहे. मी आणि माझे मित्र मैत्रिणी आमच्या बिझी शेड्यूल्स मधून वेळ काढून भेटत असतो, मजा करीत असतो. आयुष्य अगदीच टाकाऊ आहे असं नाही. आपण नेहमी आपली दुःखच उगाळत राहतो आणि सुखांसाठी देवाचे आभार मानायचे राहून जातात तसंच काहीसं हा ब्लॉग लिहिताना झालं माझं.

लिहिताना सुरुवात काही वेगळंच डोक्यात ठेवून केली होती. लिहिण्याचा ओघात एकेक घडी उलगडत गेली. काही गोष्टींकडे मागे वळून बघताना तटस्थपणे पाहता आलं. त्या क्षणी मला त्या व्यक्तीचा आलेला राग किती अवाजवी होता हे बऱ्याच वेळा जाणवलं. अनेकदा लिहायचा कंटाळा आला. वाचायचाही नक्की आला असेल, पण अनेकदा अगदी मध्यरात्रीपण मी काही पोस्टस लिहिले. तेव्हा लिहायचंच होतं असं झालं.

शमाने मला इथे लिहायची परवानगी दिली म्हणून तिचे खूप खूप थँक्स. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर एवढ्या लोकांनी मी लिहिलेलं वाचलं नसतं आणि दुसरं म्हणजे तिने ज्या पद्धतीने लिहिलं त्याच्याशी सुसंगत काहीशीच ही संकल्पना होती. आता तिनं पुन्हा एकदा लिहायला सुरवात करावी आय ऍम डाइंग टू रीड यू शमा.

आणि सर्व वाचकांचे, आणि मुद्दाम कमेंट लिहून कळवणाऱ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या प्रोत्साहनानेच मला इतकं लिहितं केलं. चैतीस पोस्ट एवढ्या पटापट नाहीतर मी उभ्या जन्मात लिहिले नसते.

माय लास्ट वर्डस ऑन धिस ब्लॉग?

आय विल मिस यू ऑल. :)

- देवयानी