मला एकदम निराश बिराश वाटायला लागलं की दोनच गोष्टी मदतीला येतात. नाटक चालू असेल तर नाटक नाहीतर तानपुरा. अर्थात दुःखाची नवलाईही पाच दिवसाचीच असते. पहिले दोन दिवस आपल्याला वाटत होतं ते न घडण्याचं दुःख आणि उरलेले तीन बॅक टू नॉर्मल येण्यासाठी लागतात म्हणून.
रविवारी संध्याकाळी असंच डिप्रेसिंग वाटत होतं. हो नाही करता करता तानपुरा काढलाच. यमनाचे आलाप सुरू केले. "म" बरोबर लागतोय असं वाटलं. विनयला म्हटलं बस जरा तबला घेऊन. "ओरी आली पियाबिना" सुरू केलं. एवढं बरं वाटलं ना? सगळं सगळं विसरवून टाकायची जादू आहे संगीतात नाही? तो एक "नि", तो एक "म" बस्स. बाकी काही दिसतंच नाही डोळ्यापुढे.
तेवढ्यात बाबा आले, ते बसले, आई आली, तीही बसली. आमच्या मजल्यावरचे भावे काका आहेत त्यांनाही बाबांनी बोलावलं. ते उत्तम पेटी (खरंतर संवादिनी म्हणायला हवं) वाजवतात. बैठक जमली. अजूनही दोघं तिघं आली ऐकायला. मी काही फार गायले नाही. पण बाबांनी त्यांची हुकमी नाट्यगीतं म्हटली, देवाघरचे ज्ञात कुणाला, रम्य ही स्वर्गाहून लंका. मग मला खास भावेकाकांसाठी "का धरला परदेस" गायला लागलं. त्यांचं अतिशय आवडतं गाणं.
किती दिवस झाले अशी मैफल जमली नव्हती. ह्या मैफलीला ना उत्तम गायक ना श्रोते. आम्हीच गायक, आम्हीच वादक, आम्हीच सबकुछ. पण तरीही आनंद अगणित. वर्णनच करता येणार नाही. अर्थात बऱ्याच दिवसांनी झाली म्हणून मजा आली. दर रविवारी झाली असती तर कदाचित इतकी मजा आलीही नसती.
पण असं काही उत्स्फूर्तपणे घडलं की फार छान वाटतं. एकदम "जिप्सी". खावं, प्यावं, गाणी म्हणावीत, गप्पा माराव्यात, पुढच्या गावी जावं, पुन्हा तेच करावं. तो अभ्यास, ती नोकरी, लग्न, असल्या कटकटी कुणी निर्माण केल्या कुणास ठाऊक?
अर्थात आमच्या ह्या बैठकीची निस्तरपट्टी आईला करायला लागली. नाही म्हटलं तरी चहा पाणी करावंच लागतं.
असो तर सांगायचा मुद्दा हा, की रात्रीपर्यंत माझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळालं. पुन्हा नवं वाटायला लागलं. आता नवं वाटायला लागलं म्हणजे काय? लिहिणं कठीण आहे.
उगाचंच आजीची आठवण आली. तिच्या भावंडांपैकी सगळे ह्या ना त्या प्रकारे शास्त्रीय संगीताशी जोडलेले. पण तिला काही जमलं नाही, एवढं वाईट वाटायचं तिला त्याचं. जाऊदे. आजी गेली तिच्याबरोबर तिला न जमलेलं गाणंही गेलं.
लाईफ जस्ट मूव्हस ऑन.
तिच्या गाण्यासाठी थांबलं नाही आणि माझ्या दुःखासाठीही.
- संवादिनी
Showing posts with label रविवार. Show all posts
Showing posts with label रविवार. Show all posts
Thursday, March 6, 2008
Thursday, February 14, 2008
मी आणि बाबा
आपण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू शकतो असे थोडेच जण असतात. माझ्यासाठी माझे बाबा तसेच आहेत. खरंखरं सांगायचं तर मला आईपेक्षा बाबा जवळचे वाटतात. म्हणजे आई आवडत नाही असं नाही. पण बाबा इज समवन स्पेशल. लहानपणापासूनच मला त्यांचा ओढा जास्त. आरडाओरड्याचं काम आईचं. ती म्हणते तसा सगळा वाईटपणा तिनं घ्यायचा. आणि त्यावर मलम लावायला बाबा. त्यामुळे नाही म्हटलं तरी बाबांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच.
पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.
ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.
सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.
मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.
उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.
एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.
आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.
एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.
पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.
आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!
मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!
ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!
- संवादिनी
पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.
ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.
सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.
मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.
उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.
एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.
आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.
एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.
पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.
आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!
मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!
ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!
- संवादिनी
Thursday, November 1, 2007
रविवार आणि सैतान
रविवार.....
काय बरं करावं आज? झोपावं नुस्त दिवसभर. ते शक्य नाही. कारणं अनेक आहेत. पण त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जहाँ पनांना ते रुचत नाही. JP म्हणजे आमचे बाबा. नाही, "आमचे" हा शब्द मी स्वतःला आदरार्थी म्हणून वापरलेला नाही. कारण ते खरोखरच "आमचे" म्हणजे माझे आणि मी ज्याला भाऊ म्हणते अश्या नतदृष्ट मुलाचे वडील आहेत. लहान भावंड असतातच की नाही नत.... जाऊदे. ते पुन्हा कधीतरी...
दुसरं कारण म्हणजे हिंदी सिनेमात हिरॉईन्सची जशी मोठ्ठी घरं असतात तसं आमचं घर नाही. चाळीत राहिल्याने, आणि मुलीची "जात" (हे एक अजब प्रकरण आहे. मुलीची जात. मुलाची जात असा शब्दप्रयोग कधी एकलाय?) असल्याने, लवकर लवकर उठून काहीही न करता बसून राहणे हा माझा रविवारच उद्योग आहे.
तसा मधून मधून मला मरीन ड्राइव्ह ला फिरायला जाण्याचा अटॅक येतो. नाही असं नाही. पण सहसा ह्या रोगची लक्षणं सोमवारी दिसून येतात. मंगळ्वार बुधवारकडे हा ज्वर वाढतो आणि बुधवारकडे उतरतो. म्हणजे रविवारी मी खडखडीत बरी. देवाच्या कृपेने वजनाच्या काट्याला माझं वजन पेलताना फरसे कष्ट होत नाहीत त्यामुळे मीही व्यायाम वगैरे फारसं मनावर घेत नाही. नाही म्हणायला मी तळवलकरांकडे जायला सुरूवात केली होती. पण ती गम्मत पुन्हा कधीतरी.
तर सकाळ अशी आळसात गेल्यावर दुपारचं जेवण. मग पुन्हा एकदा आपली जात पात सांभाळत वामकुक्षी वगैरे जी म्हणतात ना ती.
कधी कधी वाटतं, अत्ता सगळी मजा आहे. आई सगळं करत्येय. लग्न झाल्यावर? मला करायला लागेल हे सगळं. म्हणजे आमचे JP चांगले आहेत. येता जाता ते थोडी फार कामं करतातच. पण शेवटी सचिन तेंडुलकरचा वाटा आईचाच ना? ऑफिस, घरची कामं. दमून जाते बिचारी. पण काय करणार. बाईची "जात".
माझंही असंच होईल का? म्हणजे मी आईएवढी होईन तेव्हा तिच्याइतकीच मीही दमेन का? मुलगी सहा दिवस ऑफिसात काम करून दमते. तिला आराम पडावा म्हणून मी हळूच तिची कामं करून टाकेन का?. म्हणजे मी मुलीच्या रोलमध्येसुद्धा काही फार कामं करत नाही. पण माझीच. म्हणजे इस्त्री, गाद्या घालणं वगैरे? बहुतेक नाही करणार.
Hopefully तोपर्यंत "जाती"चा प्रभाव तितकासा राहिला नसेल. नवरोजीला जुंपेन कामाला.
मला कधी कधी ना तिच्या उत्साहाचं कौतूक वाटतं. सतत काम. घरचं, ऑफिसचं, आमचा त्रास, आमची भांडणं, सगळं सहन करून ही बाई हसतमूख असतेच कशी?
भविष्यातल्या प्रश्नांची चिंता अत्ताच कशाला करा. टाईम आएगा तभी देखेंगे.
अशा विचारातच संध्याकाळ येते. रविवारची संध्याकाळ. लागे हृदयी हुरहूर. संध्याकाळी एकावं. तेसुद्धा रविवारच्या. उद्याचं ऑफिस दिसतंय. ज्याला बघून अजिबात छान वाटत नाही असा आमचा बॉस डोळ्यासमोर. लोकं फिरायला जातायत. आपल्या नवऱ्याबरोबर, मुलांबरोबर. आता मी या कोणत्याच गटात मोडत नाही ना. म्हणजे, लग्न झालं नाही. म्हणून नवरा नाही. मुलं तर नाहीच नाहीत. बरं आई वडलांबरोबर फिरायला जाण्याचं वय नाही. आम्हाला ते मानवत नाही, आणि आमच्या मातातातांना तर ते अजिबातच मानवत नाही. बरोबरीच्या मैत्रिणींची लग्न जमली तरी आहेत नाहीतर झाली तरी आहेत. काहींना बाळं पण आहेत. (त्यातल्या एकाने मला मावशी अशी हाक मारली तेव्हा कसलं म्हातारं झाल्यासारखं वाटलं मला). म्हणजे थोडक्यात काय? तर रविवारी संध्याकाळी मी एक गटाबाहेरचा शब्द होऊन जाते.
म्हणूनच लागे हृदयी हुरहूर. वाटतं आपलाही एक तो असावा. खूप देखणा स्मार्ट वगैरे नको. फक्त गोड हसणारा असावा. म्हणजे एकदम गुळाची ढेप नको, पण ए. ए. स्वीटस च्या काजूवड्यांइतपत चालेल.
म्हणजे तसा तो कुठेतरी आहेच. मला माहीत नाही इतकंच. मग मनाचा वेडा खेळ. तो अत्ता काय करीत असेल? म्हणजे जो कोण तो आहे तो. जिथे तो आहे तिथे. त्याचा नाही पत्ता पण तो काय करत असेल ह्याची चिंता.
आमच्या JP ना मी विचारलं आईची ऑळख होण्याआधी त्यांचं असं व्हायचं का? ते म्हणाले, वाचन कर. रिकामे मन म्हणजे सैतानाची प्रयोगशाळा असते. माझ्या काजूवडीला एकदम सैतानच करून टाकला की हो त्यांनी. जाऊदे आमचे JP मोघले आझम मधल्या JP सारखेच आहेत. फक्त त्यांचा सलीम आणि सल्मा त्यांना फारसं मनावर घेत नाहीत इतकंच. हे मी काय लिहिलं? JP म्हणतात तेच खरं. रिकामं मन is equal to Saitan's Lab
- संवादिनी
काय बरं करावं आज? झोपावं नुस्त दिवसभर. ते शक्य नाही. कारणं अनेक आहेत. पण त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जहाँ पनांना ते रुचत नाही. JP म्हणजे आमचे बाबा. नाही, "आमचे" हा शब्द मी स्वतःला आदरार्थी म्हणून वापरलेला नाही. कारण ते खरोखरच "आमचे" म्हणजे माझे आणि मी ज्याला भाऊ म्हणते अश्या नतदृष्ट मुलाचे वडील आहेत. लहान भावंड असतातच की नाही नत.... जाऊदे. ते पुन्हा कधीतरी...
दुसरं कारण म्हणजे हिंदी सिनेमात हिरॉईन्सची जशी मोठ्ठी घरं असतात तसं आमचं घर नाही. चाळीत राहिल्याने, आणि मुलीची "जात" (हे एक अजब प्रकरण आहे. मुलीची जात. मुलाची जात असा शब्दप्रयोग कधी एकलाय?) असल्याने, लवकर लवकर उठून काहीही न करता बसून राहणे हा माझा रविवारच उद्योग आहे.
तसा मधून मधून मला मरीन ड्राइव्ह ला फिरायला जाण्याचा अटॅक येतो. नाही असं नाही. पण सहसा ह्या रोगची लक्षणं सोमवारी दिसून येतात. मंगळ्वार बुधवारकडे हा ज्वर वाढतो आणि बुधवारकडे उतरतो. म्हणजे रविवारी मी खडखडीत बरी. देवाच्या कृपेने वजनाच्या काट्याला माझं वजन पेलताना फरसे कष्ट होत नाहीत त्यामुळे मीही व्यायाम वगैरे फारसं मनावर घेत नाही. नाही म्हणायला मी तळवलकरांकडे जायला सुरूवात केली होती. पण ती गम्मत पुन्हा कधीतरी.
तर सकाळ अशी आळसात गेल्यावर दुपारचं जेवण. मग पुन्हा एकदा आपली जात पात सांभाळत वामकुक्षी वगैरे जी म्हणतात ना ती.
कधी कधी वाटतं, अत्ता सगळी मजा आहे. आई सगळं करत्येय. लग्न झाल्यावर? मला करायला लागेल हे सगळं. म्हणजे आमचे JP चांगले आहेत. येता जाता ते थोडी फार कामं करतातच. पण शेवटी सचिन तेंडुलकरचा वाटा आईचाच ना? ऑफिस, घरची कामं. दमून जाते बिचारी. पण काय करणार. बाईची "जात".
माझंही असंच होईल का? म्हणजे मी आईएवढी होईन तेव्हा तिच्याइतकीच मीही दमेन का? मुलगी सहा दिवस ऑफिसात काम करून दमते. तिला आराम पडावा म्हणून मी हळूच तिची कामं करून टाकेन का?. म्हणजे मी मुलीच्या रोलमध्येसुद्धा काही फार कामं करत नाही. पण माझीच. म्हणजे इस्त्री, गाद्या घालणं वगैरे? बहुतेक नाही करणार.
Hopefully तोपर्यंत "जाती"चा प्रभाव तितकासा राहिला नसेल. नवरोजीला जुंपेन कामाला.
मला कधी कधी ना तिच्या उत्साहाचं कौतूक वाटतं. सतत काम. घरचं, ऑफिसचं, आमचा त्रास, आमची भांडणं, सगळं सहन करून ही बाई हसतमूख असतेच कशी?
भविष्यातल्या प्रश्नांची चिंता अत्ताच कशाला करा. टाईम आएगा तभी देखेंगे.
अशा विचारातच संध्याकाळ येते. रविवारची संध्याकाळ. लागे हृदयी हुरहूर. संध्याकाळी एकावं. तेसुद्धा रविवारच्या. उद्याचं ऑफिस दिसतंय. ज्याला बघून अजिबात छान वाटत नाही असा आमचा बॉस डोळ्यासमोर. लोकं फिरायला जातायत. आपल्या नवऱ्याबरोबर, मुलांबरोबर. आता मी या कोणत्याच गटात मोडत नाही ना. म्हणजे, लग्न झालं नाही. म्हणून नवरा नाही. मुलं तर नाहीच नाहीत. बरं आई वडलांबरोबर फिरायला जाण्याचं वय नाही. आम्हाला ते मानवत नाही, आणि आमच्या मातातातांना तर ते अजिबातच मानवत नाही. बरोबरीच्या मैत्रिणींची लग्न जमली तरी आहेत नाहीतर झाली तरी आहेत. काहींना बाळं पण आहेत. (त्यातल्या एकाने मला मावशी अशी हाक मारली तेव्हा कसलं म्हातारं झाल्यासारखं वाटलं मला). म्हणजे थोडक्यात काय? तर रविवारी संध्याकाळी मी एक गटाबाहेरचा शब्द होऊन जाते.
म्हणूनच लागे हृदयी हुरहूर. वाटतं आपलाही एक तो असावा. खूप देखणा स्मार्ट वगैरे नको. फक्त गोड हसणारा असावा. म्हणजे एकदम गुळाची ढेप नको, पण ए. ए. स्वीटस च्या काजूवड्यांइतपत चालेल.
म्हणजे तसा तो कुठेतरी आहेच. मला माहीत नाही इतकंच. मग मनाचा वेडा खेळ. तो अत्ता काय करीत असेल? म्हणजे जो कोण तो आहे तो. जिथे तो आहे तिथे. त्याचा नाही पत्ता पण तो काय करत असेल ह्याची चिंता.
आमच्या JP ना मी विचारलं आईची ऑळख होण्याआधी त्यांचं असं व्हायचं का? ते म्हणाले, वाचन कर. रिकामे मन म्हणजे सैतानाची प्रयोगशाळा असते. माझ्या काजूवडीला एकदम सैतानच करून टाकला की हो त्यांनी. जाऊदे आमचे JP मोघले आझम मधल्या JP सारखेच आहेत. फक्त त्यांचा सलीम आणि सल्मा त्यांना फारसं मनावर घेत नाहीत इतकंच. हे मी काय लिहिलं? JP म्हणतात तेच खरं. रिकामं मन is equal to Saitan's Lab
- संवादिनी
Subscribe to:
Posts (Atom)