Thursday, September 25, 2008

प्रश्न, उत्तर आणि बेड्या

हा माझा इथला अखेरचा आठवडा. काम संपलं असं म्हणू शकत नाही कारण प्रोजेक्ट चालू राहणारंच आहे. मी एकटीच परत चाललेय. पुढच्या मुक्कामाची कागदपत्र तयार होईपर्यंत मला इथे पाठवली होती. ती तयारी होत आलेली आहे. मलाही इथे कंटाळा आलेलाच होता. घराची ओढ होतीच आणि त्याला भेटायचीही.

तो म्हणजे बाबाच्या सीसीआय मधल्या मित्राचा मुलगा. मी दिल्लीला जायच्या आधी बाबा मला हिंदू जिमखान्यावर डिनर ला घेऊन गेला होता. तिथेच बाबाने त्याला आणि त्याच्या आई बाबांनाही बोलावलं होतं. उद्देश हा होता की आमची ओळख व्हावी आणि त्यातून पुढे काही जमलं तर बघावं. पण बाबाने मला असं काहीही सांगितलं नव्हतं. हॅरी पॉटर थोडासा इंडियन झाला, त्याने थोडा वेगळा चस्मा लावला आणि थोडासा तो गंभीर झाला तर कसा दिसेल? तसा दिसला तो मला. म्हणजे बघून आवडला. पण त्यात सीरियस काहीच नव्हतं.

अर्थात आम्ही एकाच वयाचे म्हणून बोलायला लागलो. म्हणाला जिमखान्याला चक्कर मारून येऊया का? नक्कीच. बोलता बोलता तो उलगडत गेला. खरंतर मीच बोलत होते, पण ऐकणंसुद्धा अर्थपूर्ण असू शकतं की नाही? खूप छान वाटलं त्याच्याबरोबर बोलून. खूप नम्र वगैरे वाटला. मी असं केलं नि मी तसं केलं अशा बढाया मारणाऱ्यातला नाही. इतरांचं कौतुक करणारा, माझं कौतुक करणारा असा वेगळाच पण रोमँटिक नाही.

दुसऱ्या दिवशी बाबाने मला सगळा प्लॉट सांगितला. मला तशी थोडी कल्पना आलीच होती. तेव्हा हे सगळं ब्लॉगवर लिहावं असं खूप वाटलं, पण नाही लिहिलं. तेव्हाची परिस्थितीच अशी होती की अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागला नसता.

आम्ही पुन्हा दोघंच भेटलो. विसाव्या मजल्यावरून मुंबई खूपच सुंदर दिसत होती. काचेच्या भिंतीशेजारचं टेबल, क्वीन्स नेकलेस आणि माझ्यासमोर तो. अजिबात मोठ्याने न बोलणारा. मोजकंच बोलणारा पण योग्य ते बोलणारा. त्याचं तिथे ते असणं, बोलणं इतकं भारावणारं होतं की माझा माझ्यावरचा ताबा सुटतोय की काय असं वाटायला लागलं. हाच का तो? ज्याच्याबरोबर माझं अख्खं आयुष्य जाणार? त्याने मला घरी सोडलं तेव्हाही मी मंतरल्यासारखीच झाले होते. त्याने मला तो प्रश्न विचारला नाही. मी विचारण्याचा प्रश्न नव्हताच, पण त्याने विचारल्याशिवाय मी उत्तर देणार नव्हते हेही नक्की ठरवलं.

कदाचित त्याला मी आवडले नसेन? असेनही. पण त्याचं जग माझ्या जगासारखं असेल का? माझं जग वेगळंच आहे. माणसांनी बनलेलं आहे ते. नाती माझ्यासाठी लाख मोलाची आहेत. पैसा तितकासा नाही. बाबाने स्वतःच्या वागण्यातून हे आम्हाला शिकवलंय. उंबरठ्याशी नाळ कधीही न तोडण्याची त्याची वृत्ती उंबरठे ओलांडूनही आमच्यात मुरली आहेच. तो, त्याचे आई, बाबा, सगळं छान आहे. घरही छान आहे. प्रभादेवी म्हणजे गिरगावापासून फार लांब नाही.

मी मुंबई सोडली आणि आमचं रेग्युलर चॅटिंग व्हायला लागलं. हा मिडिआ त्रासदायक छान आहे. त्या दोन महिन्यात आम्ही एकमेकांना जसे उलगडलो तसे कदाचित रोज भेटूनही उलगडलो नसतो. पुन्हा मुंबईला गेले, पुन्हा त्याला भेटले. मग इथे आले. फोनाफोनी चालूच होती. आणि त्याने मला शेवटी सांगितलं ही वॉंटस टू मॅरी मी. जोपर्यंत प्रश्न विचारला नव्हता तोपर्यंत सगळं छान होतं. मुंबईला भेटू तेव्हा सविस्तर ह्याबाबत बोलू असं सांगून मी वेळ टाळली.

खरंच मी लग्नाला तयार आहे का? मला तो आवडला, पण लग्नाच्या जोखडात स्वतःला गुंतवून घ्यायला मी खरंच तयार आहे का? भांडून, झगडून करिअरसाठी मी घराबाहेर पडले. नशिबाचे फासे चांगले पडत गेले, प्रगती झाली. मुंबईत चार वर्षाच्या नोकरीत जेवढा अनुभव नाही आला तो गेल्या सहा महिन्यात मिळाला. उद्याची चिन्ह आशादायक आहेत. दोनंच आठवड्यात मी पुढच्या मोठ्या मुक्कामाला जाईन. तिथे मोठी जबाबदारी, मोठं शिक्षण, मोठा अनुभव. आपण काहीतरी कंस्ट्रक्टीव्ह करत आहोत हे फिलिंग? ते सगळं सोडून देऊ? नाही म्हटलं तरी लग्न म्हटलं म्हणजे नवऱ्याच्या दावणीला बांधून घेणं आलं. नोकरी करू शकेन पण मुंबई सोडू शकेन का? तडजोड करावीच लागेल आणि लग्न झाल्यावर तडजोड करायची जबाबदारी फक्त मुलीच्याच अंगावर पडते ना?

मला खूप मोठं व्हायचंय मग आताच माझ्या पायात मी लग्नाच्या बेड्या अडकवून घेऊ का? बरं त्याला माझ्यासाठी टांगवत ठेवणं मला मान्य नाही. उद्या मी ज्या प्रोजेक्टवर जाणार आहे तिथे किमान दोन वर्ष राहावं लागेल असं सांगितलंय. एवढे दिवस तो थांबेल? माहीत नाही. विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलेय.

मला वाटायचं की आय ऍम समवन हू कॅन हॅव द केक अँड इट इट टू. बट आय गेस आय कांट.

- संवादिनी

14 comments:

Sneha said...

sam.. dnt think like that... but i think u have to talk wid him abt this... kahi goshti bolun mokal vhav... nahitar tya goshtit jiv adakun rahato... just speeck out.. sagal chan hoil...
:)

मन कस्तुरी रे.. said...

"आणि लग्न झाल्यावर तडजोड करायची जबाबदारी फक्त मुलीच्याच अंगावर पडते ना?".......
असांच काही नाही संवदिनी.
मुलांनाही बर्‍याच गोष्टिंना मोडता घालावा लागतो.
त्यांचीही जबाबदारी वाढतेच ना?
असं काही वाटून घेऊ नकोस...आणि इतका परिचय झाल्यावर, चॅटींग वगैरे केल्यावर, आता "लग्नाचा माझा मुळी विचारच नाही..." असे म्हणणे संयुक्तीक दिसेल का? तूच सांग....

परिपक्वतेच्या या सार्‍या पायर्‍या चढाव्याच लागतात, बाई!

Monsieur K said...

:)
have u read Milan Kundera's "The Unbearable Lightness of Being"?

अनिकेत भानु said...

म्याट्रीक्स मधली oracle म्हणते... "You've already made the decision; now you have to understand it".

बाकी एवढ्या मोठ्या magnitude च्या decision वर काय comment करणार कपाळ!

Anonymous said...

if u have chatted so much and gotten to know each other well, won't he already have an idea of your turmoil? if not you should let him know, agree with sneha! good luck.

Jaswandi said...

aniketchi comment awadali :)

Anonymous said...

मुली, एका प्रश्नाचे उत्तर दे (स्वत:लाच). तू अपेक्षांच्या वाटेवरून प्रेमाच्या गावात तर नाही ना चाललीयेस? तसे असेल तर तो धोक्याचा इशारा समज (अगदी लाल नसला तरी केशरी जरूर :) ) आणि ठरव, is it worth it?

विमल मोरे said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Bhagyashree said...

mala asa vatta ki je manat ahe te tyala sang. tumhi dogha milun tharwa.. discuss kara.. tumchya doghanchya life cha prashn ahe!
ani ho, engagement houn, itka kaL long distance relationship thevnare lokahi ahet. far vait+chhan kaaL asto.. chhan ashasathi karan lagna adhi sagla bestt ch asta.. vait karan lamb rahav lagta..

so imo you two shud discuss and decide.. All the best !!

Anonymous said...

ya blogchi link fakt tyala pathaw baki kahi sangayachi garaj nahi bhasnar...tyala tyach uttar milel aani tula tyacha reply hi...mady

Jaswandi said...

Samvadini... bhagyashreecha aiku nako :)

lagn almost tharun zalyawar 2 varsha lamb rahana khau nahiye ga (swanubhav)

ani khara khara sangu tar he sagla blogwar nako lihu, tuzyavishayi chi kalaji ani premapoti aamhi tula kahitari salle deu ani tyanni fakt tuza confusion vadhel... karan final decision tuza ahe ani to tulach ghyayacha ahe!

aplyala je havay, je awadatay tyacha tyag karun konachitari nokari karana mhanaje khup motha hona ahe ka? hyacha vichar kar!

tu pahiilyapasunch lagnakade itka negatively ka baghatyes? "lagnachya bedya" n all nako bolu asa bai! darveli asa nasta

i will say, u r still the one who can have d cake and eat it too...vichar kar! :)

(online kadhi astes? khup diwasat bhetlich nahiyes... bolaychay ga)

Bhagyashree said...

hey jaswandi! mi tila asa kar asa navta mhanala.. i just told, there are ppl out there who do such things.. pan aplyala te jamnar ahe ka, nokari vagere kharach 'itaki' mahatvachi ahe ka ya goshti apalya apan tharvaychya..

thats why i said, u 2 shud discuss and decide.. long distance relationship ch dukkha malahi mahitiy g! :( :)

Jaswandi said...

hehe.. aga ho ga! mi asach mhantla! :)